समजायचं शब्दांची गर्दी होतेय...
मग काय ;
शाईचं दौत नजीकच ठेवायचं
आणि राहून राहून
लेेखणीला शाईशी भेटवायचं...
पुन्हा लटकवायचं ते दौत चौकटीला आणि
खडसावून सांगायचं लेखणीच्या टोकाला
' स्मरणे तुझी , तुज जवळ ठेव ,
शब्दांची किमया लाख मोलाच्या क्षणाखेरीस होते ,
अन्यथा काहीच हरकत नव्हती
प्रत्येक बिंदू जोडताना तुला शाईत बुडवण्यास.... '
शामल दीपा
shamaldeepa00@gmail.com

No comments:
Post a Comment