( आई वडील दोघेही शिक्षक असताना आम्हा मुलांच्या मनातील भावना काय असतात याचे वर्णन ....
माझी स्वलिखित आणि स्वानुभवावर
आधारित कविता ..... )
" सकाळी उठवते आई जिला भलतीच गडबड ,
बाबांना तर वेळच नसतो ऐकायला माझी बडबड ,
शिकवतात शे-दोनशे पोरांना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणतात आमच्याशी बोलताना ....
शाळेतलं शाळेत ठेऊन यायचं अशीच त्यांची शिकवण ,
आले की जरा चिड-चिड करतात तोच कंटाळवाणा क्षण ,
आम्हाला काही शाळेत हाताला धरून कोणी नेत नाही ,
पण समाज मात्र 'दोन पगारवाल्यांचं पोर' असाच
आमच्याकडे पाही ...
आम्हाला नाही ऐकू येत घरी गेले की 'सोनू'अशी आईची हाक,
घरी आले नसतं मिळत खायला गरम-गरम काहीतरी झ्याक ,
शाळेतील मुलांशी बोलून येता त्यामुळे तुम्ही खूप थकता ना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणता आमच्याशी बोलताना .....
रोज वाटतं आपल्यालाही आई वा बाबांनी शाळेत सोडावं ,
अन शिक्षकांना सरकारने लावलेल्या वेळेच्या
कुंपणाला तोडावं ,
अहो शासन मंडळी जरा आई-वडील आमचे
आमच्यासाठी द्या ना ,
पण घरी मात्र नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
कधी-कधी रविवारिही ड्युटीच यांची ,
'परीक्षेचे सुपरविजन' तर कधी घाई 'ज्यादा तासांची' ,
आई-बाबा तुम्ही कोणाचे हे मला सांगाल ना !
पण घरी मात्र नाही म्हणतात आई-बाबा
आमच्याशी बोलताना ....
कड्या-कुलुपं घालायला शिक्षकांची मुलं गुणवंत ,
कारण घरातून पडता बाहेर मुलेच त्यांची औक्षवंत ,
खरं तर सगळी जबाबदारी आणि समज मिळतो
आम्हाला 'गर्भातच' ,
गप्पांसाठी वेळ आम्हाला संध्याकाळी मिळाला तरंच ....
तरी नशीब शासनाने सगळ्याच 'वसतिशाळा' नाही ठेवल्या ,
नाहीतर शिक्षकांची मुलं म्हणजे 'सनाथ' असून असती 'अनाथ बावल्या' ,
ते कसलं 'इलेक्शनचं ट्रेनिंग' आणि 'ड्युटीनं' आम्हाला नकोसं वाटतं ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
शाळेतून घरी आल्यावर नाही होत आमची लवकर भेट ,
आई-बाबा घरी यायला सहाच वाजतात थेट ,
संध्याकाळी तर आमचा 'अभ्यास' , आणि 'स्टडी' ची वेळ ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....
पालकांचे आले फोन तर लगेच मूड चांगला करून बोलतात ,
माझे आई-बाबा 'पालक मिटिंग' ला मला माझ्या
शाळेत यावेसे वाटतात ,
पण तेंव्हाच नेमकं त्यांचं 'ट्रेनिंग' कसं येतं कळतंच नाही ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
आजारी पडलो आम्ही तर कुठे रजा टाकून घरी असतात ,
तेव्हा मात्र 'धावपळ स्टॉप' आणि 'अश्रू' त्यांचे गळतात ,
म्हणून वाटतं सारखं-सारखं आजारी पडावं अन भेटावं
'आई बाबांना' ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
कट-कट शाळेतली ऐकून ते बिचारे थकतात हो ,
मात्रं यांची शाळेची बोलणी ऐकून फोडावा वाटतो टाहो ,
कोणीतरी आमचा विचार करून पहा ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!! "
शामल
shamaldeepa00@gmail.com
माझी स्वलिखित आणि स्वानुभवावर
आधारित कविता ..... )
" सकाळी उठवते आई जिला भलतीच गडबड ,
बाबांना तर वेळच नसतो ऐकायला माझी बडबड ,
शिकवतात शे-दोनशे पोरांना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणतात आमच्याशी बोलताना ....
शाळेतलं शाळेत ठेऊन यायचं अशीच त्यांची शिकवण ,
आले की जरा चिड-चिड करतात तोच कंटाळवाणा क्षण ,
आम्हाला काही शाळेत हाताला धरून कोणी नेत नाही ,
पण समाज मात्र 'दोन पगारवाल्यांचं पोर' असाच
आमच्याकडे पाही ...
आम्हाला नाही ऐकू येत घरी गेले की 'सोनू'अशी आईची हाक,
घरी आले नसतं मिळत खायला गरम-गरम काहीतरी झ्याक ,
शाळेतील मुलांशी बोलून येता त्यामुळे तुम्ही खूप थकता ना ,
पण घरी मात्र 'नाही' म्हणता आमच्याशी बोलताना .....
रोज वाटतं आपल्यालाही आई वा बाबांनी शाळेत सोडावं ,
अन शिक्षकांना सरकारने लावलेल्या वेळेच्या
कुंपणाला तोडावं ,
अहो शासन मंडळी जरा आई-वडील आमचे
आमच्यासाठी द्या ना ,
पण घरी मात्र नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
कधी-कधी रविवारिही ड्युटीच यांची ,
'परीक्षेचे सुपरविजन' तर कधी घाई 'ज्यादा तासांची' ,
आई-बाबा तुम्ही कोणाचे हे मला सांगाल ना !
पण घरी मात्र नाही म्हणतात आई-बाबा
आमच्याशी बोलताना ....
कड्या-कुलुपं घालायला शिक्षकांची मुलं गुणवंत ,
कारण घरातून पडता बाहेर मुलेच त्यांची औक्षवंत ,
खरं तर सगळी जबाबदारी आणि समज मिळतो
आम्हाला 'गर्भातच' ,
गप्पांसाठी वेळ आम्हाला संध्याकाळी मिळाला तरंच ....
तरी नशीब शासनाने सगळ्याच 'वसतिशाळा' नाही ठेवल्या ,
नाहीतर शिक्षकांची मुलं म्हणजे 'सनाथ' असून असती 'अनाथ बावल्या' ,
ते कसलं 'इलेक्शनचं ट्रेनिंग' आणि 'ड्युटीनं' आम्हाला नकोसं वाटतं ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
शाळेतून घरी आल्यावर नाही होत आमची लवकर भेट ,
आई-बाबा घरी यायला सहाच वाजतात थेट ,
संध्याकाळी तर आमचा 'अभ्यास' , आणि 'स्टडी' ची वेळ ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....
पालकांचे आले फोन तर लगेच मूड चांगला करून बोलतात ,
माझे आई-बाबा 'पालक मिटिंग' ला मला माझ्या
शाळेत यावेसे वाटतात ,
पण तेंव्हाच नेमकं त्यांचं 'ट्रेनिंग' कसं येतं कळतंच नाही ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
आजारी पडलो आम्ही तर कुठे रजा टाकून घरी असतात ,
तेव्हा मात्र 'धावपळ स्टॉप' आणि 'अश्रू' त्यांचे गळतात ,
म्हणून वाटतं सारखं-सारखं आजारी पडावं अन भेटावं
'आई बाबांना' ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना .....
कट-कट शाळेतली ऐकून ते बिचारे थकतात हो ,
मात्रं यांची शाळेची बोलणी ऐकून फोडावा वाटतो टाहो ,
कोणीतरी आमचा विचार करून पहा ना ,
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!
पण खरंच नाही म्हणतात 'आई-बाबा'
आमच्याशी बोलताना ....!! "
शामल
shamaldeepa00@gmail.com
आज तू तुझ्या मनातील द्विधा व्यक्त केली आहेस. तुझ्या आई बाबाबद्दल ची आपुलकी, ओढ तू सांगितली.
ReplyDeleteनाहीतर बरेच जण असतात ज्यांना एवढं सगळं सुखः मिळून देखील त्यांना आई बाबा नकोसे वाटतात. 👍
लिहित रहा.
This comment has been removed by the author.
ReplyDelete